
सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी जागा राखीव असताना त्या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यानंतर जेव्हा छाननी प्रक्रिया पार पडली त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अर्ज वैध ठरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.



